मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर निवडणूक मैदानात उतरली असून आज (दि.१) २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातला मात्र एकही उमेदवार नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण १०० जागांवर उमेदवार देण्यात असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे अद्यापही ७३ उमेदवार घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे सध्या जरी पहिल्या यादीत केवळ मुंबई आणि नाशिक भागातील उमेदवार दिसत असले तरी पुढील याद्यांमध्ये राज्याच्या अन्य भागातले उमेदवार दिसण्याची शक्यता आहे.