अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे पैसे – आ.अनिल पाटील

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत. आमदार अनिल पाटील यांनी यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविल्याने शासनाने दखल घेत संबंधित निधी वितरणासाठी काढला आहे. दि ३० ऑगस्ट रोजी थेट शासन निर्णय काढल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे.

हा निर्णय घेतल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी शासनाच्या काळात हा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष आभार व्यक्त केले. आहेत. दरम्यान २०१९ पासून हा विषय प्रलंबित असताना आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यापासून शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. सुदैवाने ते सत्ताधारी आमदार असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वैयक्तिक आग्रह आमदारांनी धरला होता, अखेर हाय पॉवर कमिटी ने हा निधी वितरित करण्यास मान्यता दिल्याने शासनाने हे पैसे वितरित करण्यास मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी शासन संपुष्टात आल्याने हा पैसा मोकळा व्हावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पैसा मोकळा करण्यासाठी आग्रह धरला होता.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील यावर भाषण करून आवाज उठविला त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक झाले होते, आज दि ३० ऑगस्ट रोजी राज्यातील अतिवृष्टीचे थकीत पैसे देण्याचा शासन निर्णय काढताना अमळनेर तालुक्यातील ४० गावातील शेतकऱ्यांचा समावेश केल्याने सदर पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content