मातोश्रीवर किती खोके जातात हे सांगायला लाऊ नका ! : रामदास कदम

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे पन्नास खोक्यांवरून राज्यात रान उठलेले असतांना माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट मातोश्रीवरच घणाघाती हल्ला केला आहे.

राज्यभरात सध्या पन्नास खोक्यांचा विषय गाजत आहे. विधानसभेत आणि विधीमंडळाया बाहेर देखील यावरून रणकंदन झाले होते. तर अजून देखील शिंदे गटाला यावरून डिवचले जाते. यावरून आता माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, मातोश्रीवर किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका.

कदम पुढे म्हणाले की, त्यांच्या नाकावर टिच्चून सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले. मग सांगितलं विधानभवनात पाय ठेवून दाखवा. सगळे आमदार विधानभवनात पोहोचले. ते बोलतात फक्त, दुसरं काय योगदान आहे. काही जमलं नाही आता खोके म्हणतात. मातोश्रीमध्ये किती मिठाईचे खोके गेले ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका’, असा सनसनाटील आरोप रामदास कदम यांनी केला.

Protected Content