धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू

Crime

जळगाव, प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यानंतर शाहुनगर येथील दिलीप आत्माराम जाधव (वय ३८) असे मयत तरूणाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. बुधवारी सकाळी खिशातील कागदपत्रांवरुन मृताची ओळख पटवण्यात आली. यानंतर नातेवाईकांना संपर्क साधला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिलीप जाधव हे विवाहित आहेत. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content