देवेंद्र फडणवीस हुकुमशहा आहे – मनोज जरांगे पाटील

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगे पाटील यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे. देवेंद्र फडणवीस हुकूमशहा आहेत. माझ्या कुटुंबियांवर हल्ल्याचा डाव रचला जात आहे, भावनिक करुन मला मागे सरकवण्याचा काम होत आहे. माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल तर मी बलिदान द्यायला आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले.

पुढे मनोज जरांगे म्हणाले की ‘मी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. यापुढे मी धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या जाती एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल, अशी भीती काहींना वाटते. माझा प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डाव आखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे. असा मोठा दावा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.

Protected Content