मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेला नर्मदा नगर परिसरातील सागर सम्राट इमारती मध्ये राहणाऱ्या अनुष्का कबसुरी (वय १७ वर्ष) या बारावीच्या विदयार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थिनी मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून तिला गुण पाहून तिला बसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.