जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा; कृषीभूषण साहेबराव पाटलांची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जुन ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीपेक्षा सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होवून दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह तातडीने आर्थिक मदत करून सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे.

Protected Content