मुंबई (वृत्तसंस्था) भाजप,शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुतीची घोषणा आज एका संयुक्त पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही वेळापूर्वीच भाजप प्रदेश कार्यालयात पोहचल्यावर माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही जागेवरुन आता वाद नाही. त्यामुळे युतीवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, महायुतीची घोषणा नुकतीच एका संयुक्तीक पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार शिवसेना,भाजप, रिपाई, रासप आदी मित्र पक्षांचा या महायुतीत समावेश आहे. तर राज्यात प्रथमच शिवसेना-भाजपा युतीची पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकावर सुभाष देसाई व महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांची स्वाक्षरी आहे.