रेल्वे भुयारी मार्गातील जीवघेण्या चेंबर्सचा धोका

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गातील चेंबरवरील जाळी ही किरकोळ अपघातांना आमंत्रण देणारी ठरत असुन गेल्या ३ दिवसांपासून ही जाळी तुटलेल्या अवस्थेत असुन याकडे मात्र नगरपालिका प्रशासनाचे जाणून साफ दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

अधिक माहिती अशी की, पाचोरा शहराला जोळणारा संभाजीराजे महाराज रेल्वेभुयारी मार्ग असुन या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचु नये म्हणून उजव्या व डाव्या बाजूला चंबर बनविण्यात आले असुन त्या चंबरवर लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. मात्र शहराकडुन महाराणा प्रताप चौकाकडे जातांना डाव्या बाजूस असलेली चंबर वरील जाळी ही गेल्या चार दिवसांपासून तुटलेली आहे. ही जाळी तुटलेली असल्याने याठिकाणी मोटरसायकलचे तसेच शाळकरी मुलांचे किरकोळ अपघात घडत असुन अनेक वृद्ध, बालक हे जखमी देखील झाले आहे. मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असुन ही तुटलेली जाळी तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी अनिल (आबा) येवले यांचेसह नागरिकांकडून तसेच शालेय विद्यार्थ्यांकडुन होत आहे.

Protected Content