नुकसानग्रस्त पिकांची भरपाई मिळावी; शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील वर्षी 2023 खरीप व रब्बी तसेच 2024 फेब्रुवारी मध्य खरीप रब्बी हंगामात अवकाळी पाऊस गारपीट तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना मात्र कानाडोळा होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे.

मागील वर्षी हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस गारपीट हवेचा वेग अतिवृष्टी अशा कारणांनी शेतकऱ्यांना वेढले होते, अद्याप शासन प्रशासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेला नसून तसेच उर्वरित पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने दिनांक 26 रोजी शुक्रवार 11 वाजता रत्ना पिंपरी येथील शिवधाम फाट्यावर. आंदोलन करून रस्त्यावर उतरणार आहेत. असे आशयाचे निवेदन पारोळा तहसीलदार आणि पारोळा कृषी विभाग पारोळा पोलीस स्टेशन पिक विमा प्रतिनिधी यांना दिले. यावेळी स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, अमळनेरचे शिवाजी पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, वाल्मीक पाटील, गुलाबराव पाटील आणि तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Protected Content