रिक्षा प्रवासात एकाच्या पिशवतील २५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील अजिंठा चौफुली ते कालिंका माता मंदीर दरम्यान रिक्षात प्रवास करणाऱ्या एका व्यावसासिकाच्या पिशवीला कट मारून पिशवीतून २५ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह रिक्षात बसलेले अनोळखी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख फिरोज शेख शादुल्ला वय ४८ रा. नांदुरा जि.बुलढाणा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून प्लास्टिक स्क्रॅप्टचा व्यवसायक करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २९ मार्च रोजी शेख फिरोज हे व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात आलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते अजिंठा चौकात रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ५२५०) मध्ये बसले. त्यावेळी रिक्षाचालकाच्या मदतीने मागे असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या जवळील पिशवीला कट मारून २५ हजारांची रोकड काढून घेतली. ते कालिंका माता मंदीराजवळ उतरले असता त्यांच्या पिशवीला कट मारल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने नजीकच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार या संदर्भात रविवारी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह बागे बसलेल्या अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी हे करीत आहे.

Protected Content