पाण्यासाठी भाजपाचा वरणगाव नगरपालिकेवर मोर्चा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहराला दहा पंधरा दिवसा आड पाणीपुरवठा केला जात असून पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. त्यांच्या निषेधार्थ आज भाजपाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

भाजपा, भाजपा महिला आघाडी व युवा मोर्चातर्फे वरणगाव नगरपालिकेवर महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रणिता पाटील व माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांच्या नेतृत्वाखालील हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

“भाजपा सरकारने वरणगाव शहरासाठी मंजूर करून दिलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करावे. अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने जर पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्वरीत सोडवला नाही; तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.” असा इशारा प्रणिता पाटील यांनी दिला आहे.

आम्ही अनेक प्रकारचे आंदोलने केली तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही. महाविकास आघाडी हे सरकार अपयशी ठरले असून भाजपाच्या काळात २५ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आणली.

Protected Content