भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपविते : पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे बिहारात सत्तांतर होत असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर मित्रपक्षांना संपविण्याचा आरोप केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राजद, कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तारूढ होण्याची तयारी सुरू केली आहे. ते आजच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्‍वभूमिवर, शरद पवार यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पवार पुढे म्हणाले की, वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भाजपाने आघात केला. भजपा मित्रपक्षांना दगा देतं हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचचं असून शिंदे गटाचं नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content