भुसावळ, प्रतिनिधी । नगरपालिकेने पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे तसेच भुसावळ शहरातील कचऱ्याचे ढीग, नाली व नाल्यांची सफाई करावी अशी मागणी जळगाव ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशन जिल्हा उपाध्यक्षा मिनाक्षी जावरे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामार्गच्या काळात बऱ्याच लोकांना भीतीचे वातावरण आहे त्यातच टायफाईड व इतर नेहमीप्रमाणे पावसाळ्यात होणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळण्याकरिता नगरपालिकेची पाण्याची टाकी स्वच्छ करणे तसेच नाली व नाले यांची सफाई करणे व कच-याचे ढीग, पेस्ट कंट्रोल करणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच ही कामे सुरू केली तर भुसावळ शहरातील नागरिकांच्या हिताचे होईल. तरी शहरातील कचऱ्याचे ढीग, नाली व नाल्यांची सफाईची कामे त्वरीत करण्याची मागणी काँग्रेसतर्फे मिनाक्षी जावरे यांनी केली आहे.