नवीन पाणीपुरवठा योजनेचे सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मौजे गलवाडे बुद्रुक येथे नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या 68 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे थाटात लोकार्पण मा.जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याचवेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी कामगार नेते एल.टी  पाटील, सरपंच सुनंदा प्रेमाराज बडगुजर, उपसरपंच गजानन दयाराम पाटील, पोलिस पाटील कैलास पाटील, ग्रापंचायत सदस्य बकुळ शांताराम गुजर, विश्वास भगवान पाटील, शोभाबाई शिवाजी बडगुजर, किशोर बडगुजर, चंद्रकांत बडगुजर, संजय तुळशीराम पाटील, दीपक चौधरी, रवींद्र गुजर, विनोद गुजर, गोपीचंद पाटील, संजय पाटील, गोकुळ पाटील, हिलाल काळे, हिलाल रामचंद्र बडगुजर, गडबड महादेव पाटील, जगतराव पाटील, मधुकर रामदास पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन संदीप पाटील, यशवंत पाटील, पंकज गोसावी, बापू पवार, मोहन बच्छाव, श्यामकांत पाटील, गुलाब बडगुजर, नितीन पाटील, बाबाजी रवींद्र पाटील, प्रकाश बडगुजर, सुनील महाजन, ताराचंद नाईक, पूनमचद नाईक, राजेंद्र गुजर, नगराज पाटील, अंबर पाटील, समा नाईक, प्रल्हाद काका, संजय पाटील, शरद पाटील, सुभाष पाटील, मधु पाटील, सुभाष बडगुजर, भावेश नंदलाल गुजर, नंदू गुजर, विशाल गुजर, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी 2515 अंतर्गत गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, 2515 अंतर्गत शेतशिव रस्ता खडीकरण रक्कम 20 लक्ष.या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.सदर कामाबद्दल सर्व ग्रामस्थांनी मंत्री अनिल पाटील व सौ जयश्री पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Protected Content