चांगल्या कामांमुळेच जनतेने आम्हाला यावेळी बहुमताने निवडून दिले – मोदी

1552108584 modi111

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ मध्ये मागील सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले होते, पण यावेळी आमची पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला मागील वेळेपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला मोदी उत्तर देत होते. भ्रष्टाचारविरोधातला आमचा लढा सुरूच राहणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

 

विरोधकांवर मोदींनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आम्ही कुणाची रेघ लहान करण्यात वेळ घालवत नाही, उलट स्वत:ची रेघ मोठी करण्यात आयुष्य वेचतो. तुम्ही इतक्या उंचीवर गेलात की, तुम्हाला जमिन दिसत नाही.’ सरकारच्या कामांविषयी बोलताना ते म्हणाले, ‘आमच्या सरकारला केवळ तीन आठवडे झालेत, पण अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. पाण्याच्या संकटाची आमचे सरकार गांभीर्याने दखल घेणार आहे. कारण शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीतल्या पारंपरिक पद्धतीतून आपण बाहेर यायला हवे.’ राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण पू्र्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

Protected Content