किरकोळ कारणावरून दोघा भावांना मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खाण्यासाठी सुपारी दिली नाही या कारणावरुन झालेल्या वादातून सात ते आठ जणांनी दोघा भावंडांना मारहाण केल्याची घटना सोमवार, १७ जुलै रोजी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील हुडको भागात घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला आहे.

 

जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडकोत पायल दुर्गेश नायडू हा कुटुंबासह वास्तव्यास आहे. घराजवळ असतांना पायल याचा भाऊ युवराज याने हस्मतखान इलियासखान यास खाण्यासाठी सुपारी दिली नाही, या रागातून हस्मतखान याच्यासह सहा जणांनी पायल व त्याचा भाऊ युवराज यास त्यांच्या घरी जावून शिवीगाळ करत मारहाण केली, त्यानंतर पुन्हा पायल यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने दोघे भावंड हे जखमी झाले आहेत. याप्रकरयाी पायल नायडू याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात हस्मतखान इलियासखान, अनिल लाईटवाला दोन्ही रा शिवाजीनगर हुडको व इतर ५ जण अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र बागुल हे करीत आहेत.

Protected Content