ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका ; चंद्रकांतदादांचे भाकीत

मुंबई (वृत्तसंस्था) ऑक्टोबर महिन्याच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होईल. तसेच १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यामुळेच यावेळीही १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यानच विधानसभा निवडणूक होतील. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही यात्राही काढण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाणार आहे. ‘अब की बार २२० पार’, असा नवा नारा असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी याआधीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर, महिनाभरात बरीच उलथापालथ होईल आणि महायुतीच्या २५० जागा निवडून येतील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Protected Content