जामनेर प्रतिनिधी । शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणार्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात ५ मजूर गंभीर जखमी, तर १० जण किरकोळ जखमी झाले.
पाळधी (ता. जामनेर) येथे मजूरांना घेऊन छोटा हत्ती हे वाहन जात होते. नाचणखेडा सबस्टेशनजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन उलटले. या अपघातामध्ये गयाबाई सुखदेव माळी (वय ६५), मंगलाबाई सुकलाल सोनार (५०), सुवर्णा किरण माळी (१७), सुपडाबाई तुकाराम चौधरी (३८), चारुदत्त विलास थोरात (२५), हे गंभीर जखमी झाले. तर मैनाबाई राजपूत, विमलबाई पाटील, सविता माळी, मनीषा चौधरी, शोभाबाई पवार, अश्विनी माळी, सगुनाबाई गीते,जनाबाई मधुकर निकम, सिंधुबाई पाटील, निर्मलाबाई सोनार, मंगलाबाई राजपूत (सर्व रा.लोहारा) हे जखमी झाले आहेत.