अभिषेक पाटील यांचा जळगावात जनसंवाद

abhishek patil jalgaon prachar

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी जनसंवाद कार्यक्रम सुरू केला असून याच्या अंतर्गत ते कान्याकोपर्‍यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीतर्फे अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबत त्यांनी शहरात जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला असून याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला आहे. ते सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या अनुषंगाने आज त्यांनी शहराच्या विविध भागांमधील मतदारांशी संवाद साधला. याला मतदारांनी प्रतिसाद देत शहरातील विविध समस्यांचे गार्‍हाणे मांडले. यावर अभिषेक पाटील यांनी आपण निवडून आल्यानंतर या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

Protected Content