भीषण अपघातात रिक्षाचालक ठार तर तीघे गंभीर जखमी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथून जामनेर येथे घरी परत जात असलेल्या रिक्षा चालकाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. हेमंत समाधान माळी (महाजन वय २५, रा. शास्त्री नगर, जामनेर) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत माळी हा जामनेर शहरात आई-वडील, दोन बहिणी यांच्यासह राहत होता. रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली आहे. दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता.(केसीएन)तेथून मंगळवारी दि. ९ जुलै रोजी मध्यरात्री दीड ते २ वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली.

या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले. यावेळी नागरिकांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.(केसीएन)प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याघटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content