नुकतेच लग्न झालेल्या तरूणाने केलं अस काही !.. कुटुंबाचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तीन महिन्यापुर्वीच लग्न झालेल्या २५ वर्षीय तरूणाने जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात राहत्या घरात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेश अनिल राठोड (वय-२५) रा.बिबा नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश राठोड हा पत्नीसह बिबा नगर परिसरात वास्तव्याला होता. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे आईवडील व मोठा भाऊ हे द्वारका नगरात वास्तव्याला आहेत. बुधवारी १९ जुलै रोजी रात्री पत्नीसोबत तो जेवन करून झोपला. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला. दरम्यान रात्रीच्या जितेशच्या पत्नीला ही घटना समजल्यानंतर त्यांनी सासू आणि सासे यांना बोलावून घेतले. त्यानंतर तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. तीन महिन्यापुर्वीच २२ मे रोजी त्याचे जितेशचे झाले होते. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content