रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा बेपत्ता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा रागातून त्याच्या घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आहे. मुलगा घरी परत न आल्याने याप्रकरणी बुधवार, ८ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी सकाळी हा मुलगा घरात कुणाला काही एक न सांगता रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला. सर्वत्र शोध घेवूनही मुलगा मिळून आला नाही. हा उशीरापर्यंत घरी परत आला नाही. अखेर या बाबत मुलाचे वडीलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी नशीराबाद पोलिसात तक्रार केली. मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढी तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

Protected Content