सावदा प्रतिनिधी । राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना आपल्या घरापर्यंत येऊन पोहचला आहे. यातच जिल्ह्यातही कोरोनाची रूग्ण नऊशेच्या उंबरठ्यावर आले आहे. यापार्श्वभूमीवर राखीव निधीतून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत करावी असे निवेदन मुख्याधिकारी यांना नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी दिले आहे.
यातच जिल्ह्यातही कोरोनाची रूग्ण नऊशेच्या उंबरठ्यावर आले आहे. सावद्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊनच्या काळात विकलांग नागरीकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोराना सारखे संकट हे सावदा शहरात येणे म्हणजेच चिंता वाढवण्याचे काम झाले. या सर्व गोष्टींचा विचार व अभ्यास करून शहरासाठी काही तरी आपल्या पर्यायाने करू व कोराना सारख्या संकटापासून शहरातील विकलांग नागरीकांना वाचवु उद्देशाने त्यांना विकलांग बांधांना आर्थीक मदत करण्याची मागणी विरोधी गटनेते नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.