चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाची धडक ; तिघांचा जागीच मृत्यू

अंजनगाव सुर्जी (वृत्तसंस्था) परतवाडा येथून अंजनगाव सुर्जीला परत येणाऱ्या चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) तसेच वाहनचालक दीपक नळकांडे (रा. सातेगाव) हे तिघे जागीच हे दांपत्य ठार झाले. सदर मृत महिलेची बुधवारी सकाळी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया होती. हे कुटुंब नागपूरहून प्रवासाला निघाले असताना ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. दरम्यान, त्यांचा मुलगा शुभम यावलेला अमरावती शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Protected Content