पुढील १५ दिवस सर्वात महत्वाचे-मुख्यमंत्री

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी पुढील १५ दिवस महत्वाचे असून नागरिकांनी घरातच बसून राहत या लढाईला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सींचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पुढील १५ दिवस हे अतिशय महत्वाचे असून जनतेने घरात राहून सहकार्य केले तर आपण ही लढाई जिंकू शकतो. जनतेने पोलीस कर्मचार्‍यांच्या अडचणी समजून घ्याव्यात असे आवाहन करतांना त्यांनी डॉक्टर्ससह आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांचे कौतकदेखील केले.

Protected Content