नंदुरबार जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

7976298 12407009 20171019625

 

नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछिल गावात गणेश विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या ६ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछल येथील तरुण शुक्रवारी दुपारी गणपती विसर्जन करण्यासाठी गावापासून जवळच असलेल्या अमरावत तलावात गेले होते. याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा तरुणांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

 

मयत तरुणांची नावं

मयतामध्ये कैलास संजय चित्रकथे (वय १७), सचिन सुरेश चित्रकथे (वय१९), विशाल मंगल चित्रकथे(१७), दीपक सुरेश चित्रकथे(वय२१), रविंद्र शंकर चित्रकथे (२९), सागर बाबा चित्रकथे(२०)

यंदा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने सर्व धरण व तलावे पाण्याने शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मयतांचे मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरू असून प्रशासनासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Protected Content