Home क्राईम कानपूर येथे नोकरीला गेलेल्या कोथळीच्या तरुणाने संपवले जीवन !

कानपूर येथे नोकरीला गेलेल्या कोथळीच्या तरुणाने संपवले जीवन !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेल्या दिपक नितीन चौधरी (वय २५) या तरुण आयआयटी इंजिनिअरने कानपूर येथे आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोथळी गावावर आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोथळी गावातील मूळ रहिवासी असलेला दीपक चौधरी हा सध्या दीपनगर येथे वास्तव्याला होता. नुकताच तो आयआयटी इंजिनिअरची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि त्याला कानपूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच तो नोकरीवर रुजू झाला होता. मात्र, कानपूर येथील त्याच्या निवासस्थानी त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या बातमीमुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि कोथळी गावातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.

दीपकच्या आत्महत्येचे वृत्त कळताच त्याच्या पार्थिवाचे कानपूरहून एम्बुलन्सने कोथळी येथे आणण्यात आले. बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी त्याचे पार्थिव गावात पोहोचले. संपूर्ण गावात आणि परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. दीपकचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दु:खद आणि शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

एक यशस्वी आणि हुशार तरुण अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, हे कोणालाही कळत नाहीये. नोकरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या अपेक्षा असलेल्या तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.


Protected Content

Play sound