अहमदनगर जिल्हयाच्या अहिल्यानगर नामांतराला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिली मंजूरी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र प्रशासनाला दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भाषण करताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला. महापालिकेनंतर आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने परवानगी दिल्यानं नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे.

Protected Content