राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती आचारसंहिता लागण्यापूर्वी केली जाईल – अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती ऑगस्टच्या अखेरीस किंवा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाईल. कारण आधीचे सरकार गेल्याने त्यांनी केलेल्या शिफारशी रद्द झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हेही उपस्थित होते.

अजित पवार गटाचे नेते म्हणाले की, आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व २८८ जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांना हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, किती जागा लढवायच्या याचा अंतिम निर्णय महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. या वेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे की ४७ आमदारांव्यतिरिक्त आम्हाला १० अपक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे विधानसभेच्या किमान ६० जागांवर आमचा दावा असेल.

Protected Content