सर्पदंश झाल्याने शेतमजूराचा दुदैवी मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बकऱ्यांचा चारा घेण्यासाठी गेलेल्या ४७ वर्षीय शेतमजूराला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील बोरनार गावात मंगळवारी ९ जूलै रोजी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय हिरामण पाटील वय-४७ रा. बोरनार ता. जळगाव असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बोरनार गावात संजय पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेले. त्यावेळी झुडूपाजवळ चारा तोडत असतांना त्यांना संर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना गावातील ग्रामस्थांनी तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content