देशात प्रथमच ‘या’ राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल केला

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात प्रथमच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काही टीएमसी नेत्यांविरोधात हा खटला दाखल केला. एक दिवसापूर्वीच ममता म्हणाल्या होत्या की, महिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की, राजभवनातील कामकाजामुळे त्या तिथे जाण्यास घाबरत आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.

2 मे रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान राजभवनच्या एका हंगामी महिला कर्मचाऱ्याने राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप केला होता. ममता सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. त्याचवेळी राज्यपालांनी राजभवनात पोलिसांच्या प्रवेशावर बंदी घातली. राज्यपालांनी याचिका केली. ही घटना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी महिलेला भडकावून व्हिडिओ बनवण्यास प्रवृत्त केले.

Protected Content