धक्कादायक : जुन्या वादातून शेतकऱ्याचा खून; मारेकरी फरार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात जाणाऱ्या रस्त्यात मुरूम टाकण्याच्या कारणावरून आणि जुने भांड्याचे वाद निर्माण करत लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर विनायक पाटील वय-४७, रा. मालपुर ता. अमळनेर असे महेश झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, प्रभाकर विनायक पाटील हे आपल्या पत्नी उज्वलाबाई प्रभाकर पाटील यांच्यासह अमळनेर तालुक्यातील मालपुर गावात वास्तव्याला आहे. त्यांच्या गावात राहणारे काही जणांसोबत जुना वाद तसेच शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. दरम्यान १९ मे रोजी दुपारी ४.३० वाच्या सुमारास शेतातील रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून गावात राहणारे ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील आणि निर्जला राजेंद्र पाटील या ८ जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेले प्रभाकर पाटील यांचा मृत्यू झाला. दरम्यान हे घटना घडल्यानंतर मारेकरी पसर झाले. याप्रकरणी प्रभाकर पाटील यांची पत्नी उज्वलाबाई पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता मारहाण करणारे ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील आणि निर्जला राजेंद्र पाटील यांच्या विरोधात मारवड गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक परिस्थिती कुमार नाईक हे करीत आहे.

Protected Content