राज्यात सायंकाळी ५.०० पर्यंत ५२.०७ टक्के मतदान

Bollywood Lok Sabha Election

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात आज (दि.२९) राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण होत आले आहे. सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५२.०७ टक्के मतदान झाले होते.

 

या टप्प्यात राज्यातील तीन कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यात एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. त्यापैकी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५२.०७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

Add Comment

Protected Content