वाकोद येथील १० शेतमजूर महिलांना रासायनिक खतातून विषबाधा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील वाकोद येथील एका शेतात मक्याला रासायनिक खत टाकत असताना १० मजुरांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. या १० मजुरांना खाजगी वाहनातून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील शेतमजूर महिला या आज मंगळवारी ९ जुलै रोजी वाकोद शिवारातील शेतात मकाच्या पिकाला रासायनिक खत देण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दुपारी ३ वाजता या रासायनिक खतामुळे त्यांना शरीरातील विषबाधा झाली. त्यामुळे सर्व मजूर महिला यांना अस्वस्थ वाटू लागले. यात द्वारकाबाई अशोक जोशी वय-३२, पूजा विजय जोशी वय -२९, ज्योती विकास जोशी वय-२८, लताबाई मेघराज जोशी वय ६५, उषा संतोष जोशी वय- ३०, गुंताबाई उत्तम जोशी वय-२२, मंगलाबाई शिवाजी जोशी वय-४० उर्मिला शिवाजी जोशी वय-२०, माधुरी शिवाजी जोशी वय-१४ आणि छाया गजानन जोशी वय-४० यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली. या घटनेत सर्व मजूर महिलांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content