२४ तासांमध्ये कोरोनाचे १५ नवीन रूग्ण; राज्यात तिसरा बळी !

मुंबई प्रतिनिधी । गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले १५ नवीन रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. तर राज्यात या विषाणूमुळे तिसर्‍या व्यक्तीचा बळीदेखील गेलेला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोनाच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवून असून ते नागरिकांना वेळोवेळी याच अपडेट देत असतात. या अनुषंगाने त्यांनी आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार गत २४ तासांमध्ये १५ नवीन रूग्णांची वाढ झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ८९ इतकी झाली आहे. दरम्यान, नव्याने संसर्ग झालेल्या रूग्णांपैकी १४ जण मुंबई तर एक पुण्यातील असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. तर राज्यात कोरोनाचा तिसरा बळी गेल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. मुंबईत फिलीपाईन्सचा नागरिक असणार्‍या एका ६८ वर्षाच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Protected Content