सुसाट वेगाने येणाऱ्या डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, कैलास लटकन कोळी रा. चिंचोली ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकऱ्या पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहे. बुधवारी २८ मार्च रोजी सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावात आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या देखील मालकीच्या बकऱ्या सोबत होत्या. गावाजवळून जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. यावेळी कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकर कडून जळगावकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ वाय ७७७३) हा सुसाट वेगाने येत असातांना रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना चिरडून टाकले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content