सिध्दार्थ नगरात मुलाला मारहाण; तीन जणांवर तक्रार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सिध्दार्थ नगरात पैश्यांच्या वादातून मुलाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील सिध्दार्थ नगरात राहणारा यश दत्तू बिऱ्हाडे याला पैश्यांच्या वादातून गेंदालाल मील परिसरात राहणारे अजीज बाब, बोचऱ्या शाहरूख आणि गोल्या (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी शिवीगाळ केली. तर तु पैसे दिले नाही तर तुला बघुन घेईल अशी धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी मुलाची आई गीता बिऱ्हाडे यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content