शिवाजीनगर ते कानळदा नाका रस्त्याचे डांबरीकरण करा : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर -लाकूड पेठ – कानळदा नाका हा ३ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

शिवाजीनगर ते  कानळदा नाका रस्ता मागील १० वर्षात महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत वादात दुरुस्त करण्यात आलेला नाही. याबाबत सार्जनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असता महानगरपालिकेने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर केलेला नाही. यामुळे हद्दी पर्यत रस्ता तयार करता येत नाही. या वादात या परिसरातील नागरिकांना व ग्रामीण भागातून येणाऱ्याना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही विभागांना सूचित करून लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शंकरसिंग  गुलाबसिंग  परदेशी, युवक अध्यक्ष विनायक पोपटराव चव्हाण, युवक उपाध्यक्ष रवींद्र वसंत पाटील, राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष चेतन  कोळी ,दगडू भाऊ परदेशी  आदींच्या स्वाक्षरी आहे.

 

Protected Content