विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्यांवरगुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गांधी नगरात माहेर असलेल्या विवाहितेला गेल्या दोन वर्षांपासून काहीही कारण नसतांना पतीसह सासू व सासऱ्यांकडून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री अमृत भुतडा (वय-३१) रा. गांधी नगर, जिल्हापेठ जळगाव यांचा विवाह कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील अमृत श्रीनिवास भुतडा यांच्याशी २० जानेवारी २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे पहिले दोन महिने आनंदाने गेले. त्यानंतर किरकोळ व लहान लहान कारणांवरून घरात पती अमृत भुतडा हा टोमणे मारणे सुरू केले. तसचे सासू प्रेमा श्रीनिवास भुतडा, सासरे श्रीनिवास गिरदरीलाल भुतडा यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ करून गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जयश्री भुतडा ह्या जळगाव येथे माहेरी निघून आल्या. मंगळवार २४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे. 

Protected Content