लॉकडाउन जवळपास निश्चित ; मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील -अस्लम शेख

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना रुग्णवाढीला फारसा ब्रेक लागत नसल्याने आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन सरकार लॉकडाउनच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, याला आता मुंबईचे पालकमंत्री  अस्लम शेख यांनीही दुजारो दिला आहे.

 

“विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार. लॉकडाउन हा शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. कारण रात्री आठ वाजता यायचं आणि लोकांसमोर बोलायचं. लोक मग या मानसिकतेतून बाहेर येत नाही. राज्य सरकारला चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन लोकांचं म्हणणं ऐकून आम्हाला हे करायचं आहे. पुढील काळासाठी चांगल्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी आम्ही लागलो आहोत. मला वाटत आजच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री  अस्लम शेख यांनी दिली.

 

काही लोकांना खासगी रुग्णालयात जायचं असतं, तिथं वेटिंग लिस्ट आहेत. पण आजही शासकीय असो वा महापालिका रुग्णालय असो, तिथे जागा उपलब्ध आहे. तिथे ऑक्सिजनही उपलब्ध आहेत. जम्बो कोविड केंद्रात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड आहेत. आताची स्थिती बघून आपण नाईट कर्फ्यू लावला. दिवसा जमावबंदी केला. वीकेंड लॉकडाउन करुन बघितला. पण, जितकी रुग्णसंख्या कमी होणं अपेक्षित आहे, तितकी होत नाही. त्यामुळे सरकार सगळ्यांचे सल्ले घेत होते. त्यातून आज गाईडलाईन्स तयार होतील आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल,” असंही अस्लम शेख म्हणाले.

Protected Content