रामानंदनगर घाटात कारने दुचाकीला उडविले; एक गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंद नगर परिसरातील घाटात दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून कार चालक घटनास्थळावरुन फरार आहे.

याबाबत माहिती अशी की, बाघ नगर येथील रहिवासी केतन प्रकाश आहिरराव ह्यांच्या घरातील पाण्याचा पंप नादुरुस्त झल्याने दि. १० रोजी ते त्यांच्या मालकीची दुचाकी क्र. एम.एच. १९ सी.एच. ८०५५ ने पंप दुरुस्तीसाठी बाजाराकडे जात होते. दरम्यान दुचाकीवर मागे कंपनीतील त्यांचा सहकारी वसीम बसलेला होता. दरम्यान, दुचाकी रामानंद नगर घाटात आली असता समोरुन येणार्‍या कार क्र. एम.एच. १९ सी.एफ. ५४७८ ने समोरुन धडक दिल्याने केतन आहिरराव व वसीम गाडीसह बाजूला फेकले गेले. यात केतन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याच वेळी कार मधील चाकलाने कार घटनास्थळी सोडून देत फरार झाला. नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी केतन यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

या प्रकरणी केतन आहिरराव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात कार चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास विश्‍वनाथ गायकवाड करीत आहे. दरम्यान, आपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून आपघाताच्या काही वेळाने संतप्त नागरिकांनी कारच्या काचा फोडत नुकसान केले आहे.

Protected Content