राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा : भाजपची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आ. रवी राणा आणी खा. नवनीत राणा यांना प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या कलमाला भाजपने विरोध दर्शविला आहे.

 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे कोर्टानं आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांच्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. कलम ३५३ सरकारी कामात अडथळा आणणे आणि कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा नवनीत राणा रवी राणा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत लावण्यात आलं असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे.

राणा दाम्पत्याच्यावतीनं मर्चंट यांनी बाजू मांडली. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पहिल्या एफआयआरमध्ये कलम १५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली. दुसर्‍या एफआयरमध्ये ३५३ कलमाचा उल्लेख करण्यात आला, तर मग पहिल्या एफआयआरमध्ये ३५३ चा उल्लेख का नव्हता असा सवाल रिझवान मर्चंट यांनी केला. तर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राणा दाम्पत्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या राजद्रोहाच्या कलमाला विरोध केला आहे. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Protected Content