दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट या परिसरातील रस्त्यांसह वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, तानाजी मालसुरे नगर आणि लेंडी नाल्यापासून ते श्रीराम चौकापर्यंत गटारी व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय व बिकट झाली आहे. याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. गटारी आणि रस्त्यांबाबत महापालिकेत अनेक निवेदने व तक्रारी देण्यात आल्यात परंतू याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. यासह महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट या रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रेते यांनी कायमस्वरूपी अतिक्रमण करून पायी जाण्याचा रस्ता देखील उपलब्ध नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा स्थानिक रहिवाशी राष्ट्रवादी काँग्रेच्या सहकार्याने महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.