मित्राच्या लग्नासाठी जाताना भीषण अपघात ; चार तरुण ठार

गेवराई (वृत्तसंस्था) मित्राच्या लग्नासाठी जात असतांना झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण-विशाखापट्टणम‌् राष्ट्रीय महामार्गावर घडली.

 

या संदर्भात अधिक असे की, फावडेवाडी येथील गणेश मोहन शिरसाठ (२२), विजय श्रीरंग नागरगोजे (३८), गोविंद गंगाराम नागरगोजे (१९), रिजवान अय्युब खाँ पटेल (२२) हे चौघे बुधवारी मित्राच्या लग्नासाठी कारने (एमएच २४, व्ही ९९२९) पाथर्डीकडे निघाले होते. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कल्याण-विशाखापट्टणम‌् राष्ट्रीय महामार्गावरील तांदळा शिवारातील गवते वस्ती अचानक वळण आल्याने व गाडी वेगात असल्याने रस्त्याशेजारील विद्युत रोहित्र असलेल्या खांबाला धडकली. अपघात एवढा भयंकर होता की, खांब उन्मळून रोहित्र कारवर पडले. या अपघातात दोन जागीच तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला.

Protected Content