ब्रेकिंग : टँकर दुचाकीच्या भीषण अपघातात २ जण ठार

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर आईलने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही वाहनांची वाहतूक खोळंबली होती.

 

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दुचाकी क्रमांक (एमपी ४८ एमआर ५३९७) वरील संदिप मानसिंग शिरसाम (वय-२४) आणि वसंत मुन्ना वरखेडे (वय-२८ दोन्ही.मुळ राहणार,धमण्या.जि.बैतूल मध्यप्रदेश) हे दोन तरूण  रविवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहराकडून भुसावळकडे जात होते. त्यावेळी नशिराबाद गावाजवळ एका भरधाव वेगाने येणारे आईल टँकर  (एमएच ०४ डीएस २२१७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघातमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. दोन्ही मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

 

टीप : सविस्तर बातमी लवकरच अपडेट करत आहोत याच लिंकवर

Protected Content