बालिकेचे अपहरण करणारा ‘तो’ नराधम अटकेत

जळगाव प्रतिनिधी । आपल्या कुटुंबियांसह पायी घरी जाणार्‍या बालिकेचे अपहरण करणार्‍या गणेश बांगर या नराधमाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या अनेक जण मुंबईहून आपल्या घरी जात आहेत. अशाच प्रकारे विदर्भात जाणार्‍या एका कुटुंबातील बालिका आणि तिच्या भावाला लिप्ट देण्याचे बहाण्याने तिचे अपहरण करण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यातील बालिकेचा शोध लागला होता. तर, यात सहभागी असणारा गणेश बांगर हा आधी देखील अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गुन्हे केल्याची माहिती देखील समोर आली होती.

दरम्यान, गणेश बांगरला पकडण्यासाठी जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका पथकाची निर्मिती केली होती. या पथकाने नाशिक पोलीसांच्या मदतीने गणेश बांगरला जेरबंद करण्यात आले आहे.

Protected Content