प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ शोधणाऱ्या मोदींमुळेच भारताची कोरोना दुर्दशा — रामचंद्र गुहा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  पंतप्रधान मोदीचे सायकोफाँटिक कॅबिनेट दोषीच  आहे. (सायकोफाँटिक म्हणजेच प्रत्येक गोष्टीत  स्वत:चा स्वार्थ शोधणारे.) मोदींच्या आजूबाजूला असणारे त्यांच्या हो मध्ये हो मिळवणारे अधिकारी, भारतीयांना निराश करणारे सर्वोच्च न्यायालयही त्यासाठी जबाबदार आहे. मात्र भारताच्या या साऱ्या  कोरोना दुर्दशेला  मोदींनाच जबाबदार धरावं लागेल असं राजकारणाचे अभ्यासक इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे म्हणणे आहे

 

इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील  जाणकार  रामचंद्र गुहा यांनी सध्या देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या गंभीर समस्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा  बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारताला  आलेल्या  अपयशासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची शैलीच मुख्यपणे कारणीभूत असल्याचं गुहा म्हणाले  . प्रसिद्ध पत्रकार करण थापा यांना  दिलेल्या मुलाखतीमध्ये गुहा यांनी मोदींनी कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळ्याची टीका केलीय.

 

“तज्ज्ञ आणि तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अवामान. तज्ज्ञांच्या शिक्षणाला फारसा मान न देण्याची वृत्ती मोदींची आहे,”   “हार्वर्डपेक्षा हार्ड वर्कला आपण प्राधान्य देतो या मोदींच्या वक्तव्यावरुन त्यांचे शिक्षणाबद्दलचे प्रेम दिसून येतं,” असा टोलाही गुहा यांनी  लगावला आहे.

 

“मला तज्ज्ञांची गरज नाही असं मोदींच म्हणाले होते. आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळंत असं मोदींना वाटतं. ते फक्त अशाच तज्ज्ञांचा सल्ला घेतात जे त्यांना अपेक्षित उत्तर देतात,” असंही गुहा यांनी मोदींच्या सल्लागारांबद्दल  म्हटलं आहे. पुढेच याच गोष्टींचा संबंध गुहा यांनी कोरोना परिस्थितीशी जोडला आहे. कोरोना परिस्थिती हाताळताना मोदींनी तज्ज्ञांना प्राधान्य देण्याऐवजी नाट्यमय धोरणं आखण्यासाला प्राधान्य दिल्याचं गुहा म्हणाले

 

पंतप्रधांनानी त्यांची धोरणं भारतातील उत्तम साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली असती तर देशात सध्या उद्भवलेली कोरोना परिस्थिती आताइतकी गंभीर नसती . सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीपकच  ठेवण्यास प्राधान्य दिलं जातंय,” असंही गुहा यांनी  म्हटलं आहे. थाळ्या वाजवणं, दिवे लागवणं, घरातील लाईट्स नऊ मिनिटांसाठी बंद करणं हे सारे प्रकार म्हणजे लोकप्रियता आणि अंधश्रद्धा असल्याचंही गुहा यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

Protected Content