पोलीसात तक्रार दिल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रौढ व्यक्तीच्या सांगण्यावरून पोलीसात तक्रार दिल्याच्या संशयावरून तीन जणांनी फायटर व लोखंडी पट्टीने दोन जणांना बेदम मारहाण करून दमदाटी केल्याची घटना अयोध्यानगरात अघडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत प्रकाश कोल्हे (वय-४३) रा. अयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच भागात राहणारे वैभव दंडे, लोकश दंडे आणि सोन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात एकाने पोलीसात तक्रार दिली होती. ही तक्रार चंद्रकांत कोल्हे यांच्या सांगण्यावरून केली असा संशय घेवून तिघांनी रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता चंद्रकांत कोल्हे आणि विशाल तुकाराम चौधरी यांना फायटर आणि लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. आमच्या नांदी लागून नका अशी दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर चंद्रकांत कोल्हे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी वैभव दंडे, लोकश दंडे आणि सोन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Protected Content