पुढील १० वर्षे मीच मुख्यमंत्री राहिल : कमलनाथ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ. तसेच पुढील १० वर्षे मीच मुख्यमंत्री राहिल,असा आत्मविश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.

 

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. तेव्हापासून काँग्रेस सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, १९ आमदारांचे भाजपकडून अपहरण करण्यात आले आहे. सध्या त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे फ्लोर टेस्ट होऊ शकत नाही. त्यांना खुद्द विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित राहावे लागेल. भाजपकडून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कमलनाथ यांनी आपण सरकार वाचवू असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, पुढील 10 वर्षे मीच मुख्यमंत्री राहिल, असा दावा त्यांनी केला आहे.

Protected Content